Skip to main content

खरंच, व्यक्त होणं एवढं अवघड असतं का?*


📄 *आठवडा 135 वा* 
 *14 जून  ते  20 जून 2020* 

 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*विषय क्रमांक 1*
*खरंच, व्यक्त होणं एवढं अवघड असतं का?*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*प्रदीप महाजन🙏😊*
*वि४*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬


मानव प्राणी भावनाशील आहे, भावना प्रासंगिक असतात आणि त्या अनुरूप उत्पन्न होतात.

भावना उत्पन्न होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे मात्र त्या दाबून ठेवणे ही कृत्रिमता आहे

मनात जे आलं ते बोलून व्यक्त होणं केंव्हाही मानसशास्त्रीय दृष्ट्या चांगलं मात्र ते दाबून साठवण करणे म्हणजे एक दिवस त्याचा स्फोट होणार हे नक्कीचं

व्यक्तीची जडण घडण कशी झाली आहे,  बालपणातच आघात झाले असले तरी किंवा कुठल्यातरी किंवा कोणाच्यातरी मग ते आपले किंवा समाज यांचा सुद्धा दबावात असल्यावर व्यक्त होणे अवघड होते , किंवा आत्मविश्वासाची कमी हे सुद्धा कारण असू शकते ,मग अशी लोकं व्यक्त होत नाहीत

याउलट जे बिनधास्त स्वभावाचे लोकं असतात ,जे मनमोकळे वावरतात , बोलतात ते सहज व्यक्त होतात आणि आनंदी जिवन जगतात

व्यक्त होणं अवघड नाही मात्र व्यक्त न होणारी लोकांचा  तसा स्वभाव परिस्थिती नुसार तयार होतो किंवा ते करून घेतात  किंवा अतिमहत्वाकांक्षा सुद्धा घातक ठरते ,यामुळे जीवन जगणे अवघड होवून बसते , मला वाटतं हा एक प्रकारचा आजार आहे, जेंव्हा व्यक्ती दबावात येतो तर त्याची मानसिक स्थिती बिघडते आणि त्याची वागणूकही सामान्य रहात नाही 

व्यक्त होण्यासाठी हवं आत्मविश्वास, वाचन, लिखाण, चर्चा, गप्पा , सकारात्मक विचार, चार लोकांशी संवाद त्यांच्याशी चांगले संबंध व्यक्त होण्यासाठी आपल्याजवळ असावीत 2,4 चांगले सुसंस्कारिक विश्वासु मित्र आणि आपले छंद जोपण्यासाठी वेळ तसेच आपण कोणाच्या सानिध्यात राहतो याचा खूप परिणाम मनावर होतो चांगल्या विचारांच्या लोकांच्या सहवासात चांगलेच विचार येतील स्वतःला चांगले घडविण्यासाठी नेहमी प्रसन्न राहिले पाहिजे त्यासाठी
प्रत्येक जीवनात किंवा सभोवताली घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा फार विचार करून ताण घ्यायला नको , जीवन संघर्ष मय झालं आहे, यामध्ये आपण स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवे, कोणीही कोणालाही टेन्शन द्यायला नको , दुसऱ्याला दिले तरी स्वतःला सुद्धा त्रास होतो, तणाव मुक्त राहणेसाठी , संगीत ऐकायला हवे, योगा करायला हवा, सकारात्मक लेख असतील त्याचे वाचन करायला हवे, ध्यान (meditation) करायला हवे, जास्त वेदनादायक बातम्या बघायला नको, कोरोना लॉक डाऊन मुळे मानवी मनावर नाही म्हटलं तरी नकारात्मक परिणाम झालेले आहेत, काही जण खूप भीतीपोटी डिप्रेशन मध्ये जातात, भीती बाळगू नये, फक्त स्वतःची काळजी घ्यावी, नेहमी चार लोकांशी संवाद कायम ठेवावा, घरात, कार्यालयात थोडे मन हलके करायला हवे, थोड्या वैचारिक विषयावर चर्चा केली पाहिजे, गप्पा टप्पा मारत राहिलं पाहिजे ,नेहमी हसत रहायला हवे,त्यासाठी विनोद बघणे  वाचत रहाणे, मन प्रसन्न राहील, सोशल मीडियावर सुद्धा चांगले सकारात्मक संदेश शेअर करणे आणि वाचणे... राजकारण आणि इतर फालतू संदेश इग्नोर करायला हवीत भक्तीसंगीत तर आवर्जून ऐकायला हवीत मग मन मोकळे प्रसन्न राहील आणि व्यक्त होणे अवघड जाणार नाही 

व्यक्त होणे अवघड नाही ते आपण अवघड बनविले आहे थोडासा बदल स्वतःमध्ये करून आनंदी राहत येईल आणि आनंदित व्यक्तीचं अधिक प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो रागातील व्यक्त होण्याने मनावर विपरीत  परिणाम होतो, म्हणून संयमाने कोणत्याही परिस्थितीला हाताळून आनंदी कसे राहता येईल व आपण व्यक्त होवून इतरांना आनंद कसा देता येईल याकडे लक्ष केंद्रित करायला हवे ......

 ♦️♦️♦️♥️♦️♦️♦️

Comments

  1. खरं म्हंटल तर मी तर अगदी मोकळेपणाने माझ्या मनात आलेले विचार सहजपणे व्यक्त करू शकतो, त्यामुळे मनावर बिल्कुल ओझं रहात नाहीं आणि आनंदाने जगू शकतो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

*भोंडला* 🐘🐘🐘🐘🐘🐘 पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळीवेगळा उत्सव.... हत्ती हे वैभवाचं प्रतिक.. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची हि पूजा.. भोंडल्याचा हा सण साजरा करण्या पाठीमागे पावसाबद्दलची कृतज्ञता ,जुन्या काळातील चालीरीती ,देवदेवतांची स्तुती यांचं दर्शन घडविले जातं.         भोंडल्याचा हा उत्सव 16 दिवस साजरा केला जातो याला हातगाही म्हणतात. हत्तीची प्रतिमा अथवा मुर्ती आणून त्याला रोज 16 दिवस रोज फुलांचा आणि 16 प्रकारच्या धान्याच्या लोम्ब्या , मक्याचे कणीस असा हार करून घातला जातो त्यातून या धान्यांची ओळख आणि त्याच महत्व लक्षात याव यासाठी ....16 वर्षांपर्यंतच्या लहान मुलींसाठीचा खर तर हा खेळ , फेर धरून गाणी म्हणायची आणि रोज एक गाणं वाढवत न्यायचं आणि 16 व्या दिवशी 16 गाणी म्हणायची भोंडल्याद्वारे पर्जन्यराजाला निरोप देताना पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत ये समृद्धी आणअसं निमंत्रण हि या द्वारे दिले जाते .या गाण्यांमध्ये एक लय आणि ताल आहे त्यामुळं त्यातील गोडी आज अ...

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..