📄 *आठवडा 135 वा* *14 जून ते 20 जून 2020* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *विषय क्रमांक 1* *खरंच, व्यक्त होणं एवढं अवघड असतं का?* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *प्रदीप महाजन🙏😊* *वि४* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ मानव प्राणी भावनाशील आहे, भावना प्रासंगिक असतात आणि त्या अनुरूप उत्पन्न होतात. भावना उत्पन्न होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे मात्र त्या दाबून ठेवणे ही कृत्रिमता आहे मनात जे आलं ते बोलून व्यक्त होणं केंव्हाही मानसशास्त्रीय दृष्ट्या चांगलं मात्र ते दाबून साठवण करणे म्हणजे एक दिवस त्याचा स्फोट होणार हे नक्कीचं व्यक्तीची जडण घडण कशी झाली आहे, बालपणातच आघात झाले असले तरी किंवा कुठल्यातरी किंवा कोणाच्यातरी मग ते आपले किंवा समाज यांचा सुद्धा दबावात असल्यावर व्यक्त होणे अवघड होते , किंवा आत्मविश्वासाची कमी हे सुद्धा कारण असू शकते ,मग अशी लोकं व्यक्त होत नाहीत याउलट जे बिनधास्त स्वभावाचे लोकं असतात ,जे मनमोकळे वावरतात , बोलतात ते सहज व्यक्त होतात आणि आनंदी जिवन जगतात व्यक्त होणं अवघड नाही मात्र व्यक्त न होणारी लोकांचा तसा स्वभाव परिस्थिती नुसार तयार होतो किंवा ते करून घेतात किंव...
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...