Skip to main content
*अशी पाखरे येती...*
ःःःःःःःःःःःः🌹
*कोकिळ* (१)


गायनाची अत्यंत आवड असणारी कोकिळ जेव्हा गायला सुरुवात करते, तेव्हा संपूर्ण वातावरण धुंद होऊन जाते. तीही मन भरून गाते. वसंत ऋतूमध्ये गाण्याअगोदर कोकिळ मंजरी, कोपले, फळ आदींचे रसास्वादन करते. गात गातच एका वृक्षावरून दुसºया वृक्षावर विहार करते अन् गाण्यात तल्लीन होऊन जाते. हेच वैशिष्ट्य आहे या गानकोकिळेचे. हिचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती वर्षातून चार महिने गात नाही. गीतांचे स्वर तिच्या कंठातून या चार महिन्यांच्या कालावधीत निघत नाही. उत्तर पश्चिम भाग वगळता भारतातील सर्व राज्यात कोकिळ आढळून येते. सर्वच ठिकाणी ती कौतुकाचा विषय असते. तिच्याबद्दल कौतुकाचाच भाव असतो. मल्याळम, चीनकडेही तिचे वास्तव्य आहे. कोकिळेचा आहार हा वटवृक्ष, अश्वत्थ आदी झाडांची छोटी छोटी फळे खावून ती आपला गुजारा करते. तिचे भोजन मोजकेच असून किडे-मासेही तिचे अनेकदा भक्ष्य बनतात. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कोकिळ हिवाळ्याच्या दिवसात दक्षिण दिशेकडे प्रयाण करते. कारण दक्षिण दिशेकडे थंडीचे प्रमाण कमी आहे. कावळ्यासारखा काळा रंग ल्यालेली कोकिळ आवाजाशिवाय ओळखू यायची नाही. तिचे मौनव्रत असते तेव्हा कावळा समजूनच आपण या पाखराकडे बघतो किंवा अनेकदा दुर्लक्षही करतो. नर-मादी कोकिळमध्ये रंगरुपाचा भेद आहे. निळ्या हिरव्याची चमक असलेली काळी कोकिळ नर असून मादी ही भुºया रंगाची मालकिण असते. लांबी ४३ सेंटीमीटर असते. शेपटी लांबलचक असते. मादी कोकिळ जून महिन्यातच अंडी देत असते. आणखी काही उल्लेखनीय बाबींनी कोकिळ प्रसिद्ध आहे... गोड गळ्याची देणगी ही केवळ नर कोकिळालाच प्राप्त झालेली आहे. मादी कोकिळ किकीऽऽकिकीऽऽ असा आवाज करते तर नर कोकिळ हा कुहूऽऽकुहूऽऽ असा सुरेख आवाज काढू शकतो.

ःःःःःःःःःःःः🌹

*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
9881152439

Comments

Popular posts from this blog

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..
*स्मरण यात्रा...*🌹  गोड त्या शब्दांचे  वेड मला लागले..  स्मरण अंतरंगी जरी,  दूरचे समीप दिसू लागले...  अर्थ त्याचा जीवाचा,  अक्षर उमटू लागले..  साक्षर साक्षात्कारात  ध्यानस्थ नवे अवतरले...  कसे ऐकावे संगित,  बासुरीत मंजुळ मावले...  ओठावर येऊनही सारे,  हृदयी अंतर्धान पावले...  वाटते एकांत महफिलीत,  श्रवण गहन करावे...  सुप्रभातीच्या प्रार्थनेला,  सूर्याला पुन्हा बोलवावे... 🌹 ............  02.01.2020 अशोक अर्धापुरे,  औरंगाबाद