🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*प्रेमभंग... नव्हे असंपन्नता...*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी प्रेम करतो वा तिचे माझ्यावर प्रेम आहे असे म्हणने वा मानने हा एक सुसंस्कृत हट्टाहासच वाटतो.. त्यातील वास्तव हे बहुधा ठिसुळ ठरते.. कारण आपण शोधत असलेले unbroken perfection हे बहुधा तेथे गवसलेले नसते..
त्यातल्या अपूर्णत्वाला आपण प्रसंगी 'प्रेमभंग' असे भर्जरी लावून स्वतःला विस्थापित करुन जगतो... हे विस्थापन अंतरंगातल्या कलाप्रांताचे, संगीतसभेचे, साहित्य जत्रेचे, चित्ररंगात रममाण असलेल्या रंगपुष्करणीचे आणि अशा असंख्य तरल स्रुजनात्मकतेचे असते.. कारण प्रेम या भावरंगांच्या विलसण्यातूनच या तरलतेच्या संपन्न वाटा जात असतात.. आणि अशाच वैभवी मानसिकतेला जेव्हा प्रेमभंगाचा कडवट अर्क प्राषन करावा लागतो तेव्हा निर्माण होणारे हे विस्थापित साम्राज्य एकट्याचेच असते.. एकट्यानेच ते जगावे लागते.. येथेच भैरवी आळवत विरहगीतांचे स्वर परवलीचे वाटायला लागताच.. भावनात्मक लिखाणाला, गझलेला, विरहणीला सन्मानाची जागा मिळत जाते.. इतर कोणी सहजतेने तसुभरही काढलेली भावूक छेड वर्मी लागत जाते.. अंतर्यामात उठबैस करणारे सर्वकष काहूर म्हणजे बिनचेहय्राचा तारकापूंजच बनतो.. हलक्याफुलक्या शब्दांचीही दहशत मनाने घेतलेली असते..
वाटते हे सारें शब्द घ्यावेत आणि ओहटीला समुद्रात नेऊन बुडवून टाकावेत.. भरतीला काठावर येऊन पडणारे याच बुडवलेल्या शब्दांचे छन्नविछीन्न भग्न अवषेश पहात पहातच विशाल सागराच्या साक्षीने एकाकीपणा जगत जावा... आपल्या वाट्याला आलेले भावनिक क्रंदन, कासाविसी, तगमग हे सारे संवेदन म्हणजे आपल्या आंसवांना अंतरातच मुरवून टाकत जाते.. आणि वाटते न जाणो भोगत असलेल्या शब्द निर्माल्यातून नवे काही अंकुरेल..
हे नवे अंकुरनच कधी कधी एका वेगळ्या आनंद पायरीवर घेऊन जाते.. नवीन निर्माणाला प्रेरक ठरते... शब्दावरचे भर्जरीपण बाजूला हटत शब्दांतले निरागसत्व मनाला भुरळ घालत जाते.. आपल्या दुःखाला वैभव प्राप्त झाल्यागत आपण आपल्यातच श्रीमंत बनतो.. आपल्या साम्राज्यावर कोणालाही द्रुश्यमान न होणारे एक तरल आच्छादन मिळत जाते.. अशा वेळेस होणारा आनंद हा विलक्षण पारलौकीकतेचाच.. आणि प्रांरभ होतो तो स्वरचनेला... ही स्वरचना जितकी निस्सीम, निःसंग आणि नतळतेची तितका आपलाच आपल्यातला रहिवास हा स्वर्गसुखाचाच.. येथे ती तो नसुनही अद्रुष्य असतो.. कधी चुकलेल्या शब्दांचे अर्थ समजावत तर कधी पश्चातापातून पतीत पावन झालेल्या स्मृतीतून.. हाती नवीन असते ते उरलेले आयुष्य..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आशोक अर्धापुरे,
औरंगाबाद..
27.09.19
*प्रेमभंग... नव्हे असंपन्नता...*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी प्रेम करतो वा तिचे माझ्यावर प्रेम आहे असे म्हणने वा मानने हा एक सुसंस्कृत हट्टाहासच वाटतो.. त्यातील वास्तव हे बहुधा ठिसुळ ठरते.. कारण आपण शोधत असलेले unbroken perfection हे बहुधा तेथे गवसलेले नसते..
त्यातल्या अपूर्णत्वाला आपण प्रसंगी 'प्रेमभंग' असे भर्जरी लावून स्वतःला विस्थापित करुन जगतो... हे विस्थापन अंतरंगातल्या कलाप्रांताचे, संगीतसभेचे, साहित्य जत्रेचे, चित्ररंगात रममाण असलेल्या रंगपुष्करणीचे आणि अशा असंख्य तरल स्रुजनात्मकतेचे असते.. कारण प्रेम या भावरंगांच्या विलसण्यातूनच या तरलतेच्या संपन्न वाटा जात असतात.. आणि अशाच वैभवी मानसिकतेला जेव्हा प्रेमभंगाचा कडवट अर्क प्राषन करावा लागतो तेव्हा निर्माण होणारे हे विस्थापित साम्राज्य एकट्याचेच असते.. एकट्यानेच ते जगावे लागते.. येथेच भैरवी आळवत विरहगीतांचे स्वर परवलीचे वाटायला लागताच.. भावनात्मक लिखाणाला, गझलेला, विरहणीला सन्मानाची जागा मिळत जाते.. इतर कोणी सहजतेने तसुभरही काढलेली भावूक छेड वर्मी लागत जाते.. अंतर्यामात उठबैस करणारे सर्वकष काहूर म्हणजे बिनचेहय्राचा तारकापूंजच बनतो.. हलक्याफुलक्या शब्दांचीही दहशत मनाने घेतलेली असते..
वाटते हे सारें शब्द घ्यावेत आणि ओहटीला समुद्रात नेऊन बुडवून टाकावेत.. भरतीला काठावर येऊन पडणारे याच बुडवलेल्या शब्दांचे छन्नविछीन्न भग्न अवषेश पहात पहातच विशाल सागराच्या साक्षीने एकाकीपणा जगत जावा... आपल्या वाट्याला आलेले भावनिक क्रंदन, कासाविसी, तगमग हे सारे संवेदन म्हणजे आपल्या आंसवांना अंतरातच मुरवून टाकत जाते.. आणि वाटते न जाणो भोगत असलेल्या शब्द निर्माल्यातून नवे काही अंकुरेल..
हे नवे अंकुरनच कधी कधी एका वेगळ्या आनंद पायरीवर घेऊन जाते.. नवीन निर्माणाला प्रेरक ठरते... शब्दावरचे भर्जरीपण बाजूला हटत शब्दांतले निरागसत्व मनाला भुरळ घालत जाते.. आपल्या दुःखाला वैभव प्राप्त झाल्यागत आपण आपल्यातच श्रीमंत बनतो.. आपल्या साम्राज्यावर कोणालाही द्रुश्यमान न होणारे एक तरल आच्छादन मिळत जाते.. अशा वेळेस होणारा आनंद हा विलक्षण पारलौकीकतेचाच.. आणि प्रांरभ होतो तो स्वरचनेला... ही स्वरचना जितकी निस्सीम, निःसंग आणि नतळतेची तितका आपलाच आपल्यातला रहिवास हा स्वर्गसुखाचाच.. येथे ती तो नसुनही अद्रुष्य असतो.. कधी चुकलेल्या शब्दांचे अर्थ समजावत तर कधी पश्चातापातून पतीत पावन झालेल्या स्मृतीतून.. हाती नवीन असते ते उरलेले आयुष्य..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आशोक अर्धापुरे,
औरंगाबाद..
27.09.19
Comments
Post a Comment