Skip to main content
*भोंडला*
🐘🐘🐘🐘🐘🐘

पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळीवेगळा उत्सव....
हत्ती हे वैभवाचं प्रतिक.. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची हि पूजा..
भोंडल्याचा हा सण साजरा करण्या पाठीमागे पावसाबद्दलची कृतज्ञता ,जुन्या काळातील चालीरीती ,देवदेवतांची स्तुती यांचं दर्शन घडविले जातं.
        भोंडल्याचा हा उत्सव 16 दिवस साजरा केला जातो याला हातगाही म्हणतात. हत्तीची प्रतिमा अथवा मुर्ती आणून त्याला रोज 16 दिवस रोज फुलांचा आणि 16 प्रकारच्या धान्याच्या लोम्ब्या , मक्याचे कणीस असा हार करून घातला जातो त्यातून या धान्यांची ओळख आणि त्याच महत्व लक्षात याव यासाठी ....16 वर्षांपर्यंतच्या लहान मुलींसाठीचा खर तर हा खेळ , फेर धरून गाणी म्हणायची आणि रोज एक गाणं वाढवत न्यायचं आणि 16 व्या दिवशी 16 गाणी म्हणायची भोंडल्याद्वारे पर्जन्यराजाला निरोप देताना पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत ये समृद्धी आणअसं निमंत्रण हि या द्वारे दिले जाते .या गाण्यांमध्ये एक लय आणि ताल आहे त्यामुळं त्यातील गोडी आज अनेक वर्षानंतरही कायम आहे ....
संध्याकाळी हत्तीची पूजा करून त्याच्याभोवती फेर धरून गाणी म्हणायची त्यानंतर खिरापत ओळखणे हा महत्वाचा कार्यक्रम ....गाण्याप्रमाणेच खिरापतीही रोज एकएकाने वाढत जायच्या मग त्या सगळ्या खिरापती ओळखण्याची स्पर्धा खूप रंगत असे ...
आमच्या लहानपणी 16 वर्ष हा भोंडला खूप मनसोक्तपणे खेळला त्यात आमचे आजी आजोबाही अगदी उत्साहाने सहभागी व्हायचे आजोबा हत्तीचं छान चित्र काढायचे पाटावर आणि कागदावरही त्याला लागणाऱ्या धान्याच्या लोम्ब्या आणायचे आजी रोज एक नवीन न ओळखणारी खिरापत शाळेतून येण्याआधीच करून ठेवायची घरी भोंडला असला तरी आधी सांगायची नाही ...सगळ्यांबरोबर ओळखा म्हणायची ....नाही ओळखली कि ती नव्हे ...नव्हे ..इतकं छान म्हणायची कि ते ऐकायला खूप छान वाटायचं ...गाणी तर सगळी पाठच होती म्हणून म्हणून त्यावेळी जी पाठ झालीत ती अजूनही पाठ आहेत...
त्यातलंच हे एक फारसं माहिती नसलेलं पण अतिशय सुंदर अस 16 कडव्यांचं गाणं.... खास भोंडल्याचं .....ती एक गोष्टच आहे...
      पूर्वी महाभारताच्या काळात  कौरव पांडव यांच्याकडे गजगौरीच व्रत होत ते म्हणजे राणीने प्रजाजनांना हत्तीवरून वाण वाटायचं ....
       कौरवांकडे हे व्रत करताना त्यांनी मातीचा हत्ती तयार करून गंधारीला त्यावर बसवून गावात वाण वाटत होते तेव्हा कुंतीलाही ते वाण दिल तेव्हा दुर्योधन कुंतीला आणि पांडवांना टोचून बोलला त्यावर पांडवानीही चोख उत्तर दिलं आणि आपल्या मातेचा मान आणि मन कसं राखलं त्यांचं हे गाणं...

गाऊ गजगौरीच गाणं, घालू रिंगण

कौरव बांधव सर्व मिळोनी
करिती हत्ती माती आणोनि
गांधारीला वरी बसवोनी
वाटीयली वाणे...1

कुंतीला ते दिधलेवाण
दुर्योधन बोले टोचून
तुम्हास आहे नशिबी कोठून
असले या जगती....2

माता कुंती कष्टी जाहली
भीम पुसे मग येऊन जवळी
शोक कशाचा चिंता कसली
सांग सांग आई.....3

 सांगे वाणाचा वृत्तांत
भीम कोपला मग चित्तात
म्हणतो हत्ती करतो क्षणात
आला नदीतीरी...4

चिखल करी मग खळ्या खणोनी
फेकी भराभर गोळे करुनी
गेल्या वेशी सर्व बुजोनी
घडला आकांत...5

अर्जुन बोले मग भीमाला
खटाटोप हाउगीचकशाला
मागू ऐरावत इंद्राला
वाटाया वाणे.....6

बाणांचा मग जिना रचिला
भीम वरी स्वर्गात निघाला
इंद्राला वृत्तांत कळाला
झाला दुश्चित......7

 इंद्र म्हणे हे अरिष्ट आले
म्हणोनी कपट इंद्राने केले
दारच स्वर्गाचे लावीयले
आवळोनी घट्ट ....8

भीमे केला गदाप्रहार
स्वर्गाचे मोडियले द्वार
आला इंद्राजवळी वीर
बोले इंद्राला....9

भीमसेन बोले इंद्राला
गजगौरीचे व्रत आईला
ऐरावत पाहिजे आम्हाला
वाटाया वाणे.....10

इंद्र म्हणे स्वर्गीचा हत्ती
द्यावा  कैसा भूमीवरती
नेणे तरी तो कवण्या रीती
नेऊ जरी म्हटले.....11

 त्यातच आहे मत्त जाहला
धजे न कोणी धरावयाला
मगतो येईल कसातुम्हाला
न्यायला खाली....12

आधीच चिडविला होता हत्ती
धावून आला भीमावरती
गदा प्रहारे जीरवी मस्ती
भीमसेन तेव्हा......13

हत्ती पळतो ची ची करोनी
‌भीम ओढीतो सोंड धरोनी
मुटकूळ त्याचे मगबांधोनी
‌टाकीयले पाठी.......14

‌आला ऐरावत घेऊनी
‌सजवी अंबारी घालोनी
‌कुंतीला वर बसवोनी
‌वाटीयली वाणे......15

 धन्य धन्य ती कुंतीमाता
‌ स्वर्गआणिलाभूवरीआता
‌गजगौरीचे व्रत आचरीता
‌लाभे जगी कीर्ती.....16

‌असं हे 16 कडव्यांचं गाणं प्रत्येक भोंडल्याच्या वेळी आम्ही म्हणायचो
(आता सहसा हे गाणं ऐकिवात नाही तरीही नव्या पिढीला माहिती असाव म्हणून हा एक प्रयत्न)

🐘🐘🐘🐘🐘🐘
 ...सौ श्रेया गोलिवडेकर, सातारा😊🙏😊🙏
                           



‌             


‌             

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अशी पाखरे येती (घार)

*अशी पाखरे येती...* ःःःःःःःःःःःः🌹 * घार * ःःःःःःःःःःःः🌹 आकाशात उडताना अधेमधे गटांगळ्या खाणे, ही विशेषता. गृहांगणाच्या (घरासमोरील अंगण) अगदी वर आकाशात भ्रमण करीत राहणे अथवा घराभोवती घिरट्या घालणे, ही वैशिष्ट्य. कुठे खाद्यवस्तू दिसताच तीव्रतेने त्यावर झेप घेऊन डोळ्यांची पापणी लवते न लवते एवढ्या चपळतेने ती वस्तू उचलून नेणे, ही खासियत. ही सर्व गुणवर्णने आहेत घार या पक्ष्याची. उभ्या माणसाच्या हातातील वस्तू अलगदपणे उचलून पळविणे हा घारीच्या डाव्या हाताचा (?) मळ आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. अशावेळी घारीच्या झडपेने माणसाचा हात जखमीही होऊन जातो. पण त्याची पर्वा या घारीला कसली? असे म्हटले जाते की, खाद्यपदार्थाशिवाय माणसाच्या हातातील कोठल्याही वस्तूचे तसेच स्त्रियांच्या हातातील दागदागिन्यांचे घारीला जबरदस्त आकर्षण असते. मोठ्या शिताफीने ती अशा वस्तूंचे अपहरण करते. बाजारातील मांस-मासोळीच्या दुकानांभोवती या घारीचं विशेषत्वानं वास्तव्य राहते. परिसरातील या भागात ती सतत घिरट्या घालत असते. मासोळी घारीचं आवडतं खाद्य असून ते उचलून नेण्यात घारीचा हातखंडा वाखाणण्याजोगा आहे. गरुडाप्रमाणे घारसु

खरंच, व्यक्त होणं एवढं अवघड असतं का?*

📄 *आठवडा 135 वा*   *14 जून  ते  20 जून 2020*   ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *विषय क्रमांक 1* *खरंच, व्यक्त होणं एवढं अवघड असतं का?* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *प्रदीप महाजन🙏😊* *वि४* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ मानव प्राणी भावनाशील आहे, भावना प्रासंगिक असतात आणि त्या अनुरूप उत्पन्न होतात. भावना उत्पन्न होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे मात्र त्या दाबून ठेवणे ही कृत्रिमता आहे मनात जे आलं ते बोलून व्यक्त होणं केंव्हाही मानसशास्त्रीय दृष्ट्या चांगलं मात्र ते दाबून साठवण करणे म्हणजे एक दिवस त्याचा स्फोट होणार हे नक्कीचं व्यक्तीची जडण घडण कशी झाली आहे,  बालपणातच आघात झाले असले तरी किंवा कुठल्यातरी किंवा कोणाच्यातरी मग ते आपले किंवा समाज यांचा सुद्धा दबावात असल्यावर व्यक्त होणे अवघड होते , किंवा आत्मविश्वासाची कमी हे सुद्धा कारण असू शकते ,मग अशी लोकं व्यक्त होत नाहीत याउलट जे बिनधास्त स्वभावाचे लोकं असतात ,जे मनमोकळे वावरतात , बोलतात ते सहज व्यक्त होतात आणि आनंदी जिवन जगतात व्यक्त होणं अवघड नाही मात्र व्यक्त न होणारी लोकांचा  तसा स्वभाव परिस्थिती नुसार तयार होतो किंवा ते करून घेतात  किंवा अतिमहत्वाकांक्षा सुद्धा घातक ठरते ,यामुळे