Skip to main content
*प्रिय मित्र...*🌹

सरते साल सारत नव्या सालाच्या उंबरठ्यावर पावले पडू पाहताहेत.. सांप्रत वर्षांनी काय दिले याचा विचार व्हायला हवा.. 

 वर्ष सुखाचे गेले असेल तर निश्चितच नाती जगणारी माणसे, निसर्ग, कला, संगीत,  साहित्य, आणि विशेषतः मैत्र जपत जगणारे सारेच आनंद देणारे भेटले.. आमच्या संपर्कात येणारा प्रत्येक सजीव निर्जीव आपल्याला नकळत व्यापून टाकत असतो.. एक  गूढ अनुभूती मनात अखंडपणे अनुभवीत होत जाते..  काय हवे काय नको ते आपण आपल्या स्वभावानुसार नकळतच  घेत जातो.. अंतरंगावर कधी काव्य तर कधी शोकांतिकेचे पडसाद उमटले जातात... यातूनच आपल्याला सुंदर ते काय शोधत आनंदसोहळे साजरे करायचे असतात..  आयुष्यावर प्रेम करायला त्याशिवाय संधी मिळतही नसते.. असे प्रेम करायला गेल्या वर्षाने शिकवले.. 

निकटच्या जगाच्या सुखदुःखाशी जडलेलं जोडलेलं अतूट नाते मनातल्या कवीला साद घालणारे असेल तर दुरस्थावरही प्रेम करणारे असते.. जी माणसे भेटली नाही तरीही ती मनातली झाली..  व्हाट्सअप आणि फेसबुक माध्यमातून माणसे भेटत गेली आणि नकळत न पाहताच जवळची वाटायला लागली..  असे अपरिचित पैलतीरावरचे विराट खूप अदभूत आहे..  त्या विरटात काव्य, संगीत, कला सारे काही आहे.. ती अदभूत देणे जेव्हा मिळते तेव्हा होणारे आनंद हे अतुलनीयच.. हे विराट बांधून ठेवायचे मोल करायला गेल्या वर्षाने शिकवलं... 

येथे देत कोणीच काही नसते.. शोधून आपले आपल्यालाच घ्यायचे असते... कारण आपले आनंद हे आपल्या अंतरंगाचे मूल्यवर्धन करणारे असतात..  आनंद देऊ शकणाऱ्या प्रसंगी आपण आपले मौल्यवान परिधान करून तत्पर असले की आनंदाचे अमाप, अपरंपार आपसूकच मिळत जाते... काही मागावे वा  मिळवावे हा हेतू नसला की जे मिळते ते ऐश्वर्यच असते.. आणि हे असे ऐश्वर्यच कलात्मक भावांना संजीवन बहाल करत जाते... मला सरत्या वर्षाने असंच काही दिले... 

नको हवे ते जे मिळाले ते ही काही शिकवून गेले.. माझ्या बायकोच्या पायाला झालेला अपघात सेवाभाव शिकवून गेला..  ईश्वराच्या लहरीपणातले अगम्य विचार करण्यासाठी निर्देशन करू लागले.. चिंतनशीलतेतून नवे भास आभास होऊ लागले..  होणाऱ्या जाणिवा अधिकच प्रगल्भ जाणवू लागल्या.. अपघातामुळे करावी लागणारी  प्रिय पत्नीची सेवा प्रेमातले नवे अनुपम शिकवून गेली... नकळतच एक नवे revealation होऊ लागले..  आत्मिक पातळीवर एक उस्फुर्त समाधान शांत अनुभवायला मिळाले... 
.... her pains focused the real Glimpse of gladden in the closely ness and through the services of oneness.. यामुळे मला  रमण्याचे मोल कळले.. सरत्या वर्षाने सकारात्मकतेची नवी ओळख करून दिली.. 

आपल्या सर्वांच्या मैत्रपूर्ण सहभागातून जे जाणवले ते शब्दपल्याडचे आहे.. आणि ते जाणिवेतच जगावेत असेच आहेत.. 

येणारे वर्ष चांगलेच असेल.. आणि हो... आपण सोबतीला आहातच.. आणि आपले तर ठरलंय... 
*आनंद देऊ.. आनंद घेऊ...* 

*नव्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा..*🌹👏🏻🌹 
...........
31.12.2019
अशोक अर्धापुरे, 
औरंगाबाद...

Comments


  1. व्वा!! सुंदर!!!
    अप्रतिम शब्दरचना,मनात दाटून आलेल्या भावना, चांगले वाईट अनुभव यांची अप्रतिम गुंफण अर्धापूरे सरांनी केलीय.मनाला भावनिकतेची जोड असली की,शब्द आपोआप बाहेर येतात आणि मन हलके होते
    मनापासून धन्यवाद

    ReplyDelete
  2. माझ्या ह्या प्रिय परिवारानी २०१९ मध्ये मला खूप खूप प्रेम आणि आनंद दिला. खरं सांगितलं तर एका संगीत ग्रुप मधून, हा माझा परिवार कधी झाला हे कळलं च नाहीं. परिवारातील सर्व रथी आणि महारथींना २०२० च्या नवीन वर्षाचे विनम्र अभिवादन🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

*भोंडला* 🐘🐘🐘🐘🐘🐘 पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळीवेगळा उत्सव.... हत्ती हे वैभवाचं प्रतिक.. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची हि पूजा.. भोंडल्याचा हा सण साजरा करण्या पाठीमागे पावसाबद्दलची कृतज्ञता ,जुन्या काळातील चालीरीती ,देवदेवतांची स्तुती यांचं दर्शन घडविले जातं.         भोंडल्याचा हा उत्सव 16 दिवस साजरा केला जातो याला हातगाही म्हणतात. हत्तीची प्रतिमा अथवा मुर्ती आणून त्याला रोज 16 दिवस रोज फुलांचा आणि 16 प्रकारच्या धान्याच्या लोम्ब्या , मक्याचे कणीस असा हार करून घातला जातो त्यातून या धान्यांची ओळख आणि त्याच महत्व लक्षात याव यासाठी ....16 वर्षांपर्यंतच्या लहान मुलींसाठीचा खर तर हा खेळ , फेर धरून गाणी म्हणायची आणि रोज एक गाणं वाढवत न्यायचं आणि 16 व्या दिवशी 16 गाणी म्हणायची भोंडल्याद्वारे पर्जन्यराजाला निरोप देताना पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत ये समृद्धी आणअसं निमंत्रण हि या द्वारे दिले जाते .या गाण्यांमध्ये एक लय आणि ताल आहे त्यामुळं त्यातील गोडी आज अ...

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..